spot_img

Andhra meals

नोकरी निमित्ताने चेन्नई मधे ४ ५ वर्ष काढली सुरुवातीचा काही काळ बॅचलर म्हणुन व लग्नानंतर पहिली ३ ४ वर्ष बायकोसह चैन्नई मधे घालवली. त्यामुळे पुण्या व्यतिरिक्त चैन्नई विषयी एक आपुलकी, आपलेपणा नेहमीच जानवतो.
साधारणपणे साऊथला राहणे आपल्या लोकांना आवडत नाही. वातावरण व विशेषतः खानपानाच्या पध्दतीमुळे आपल्या लोकांना इकडे नकोस वाटते.
मात्र माझा अनुभव वेगळा आहे. माझाच नाही तर ज्यांनी कोणी इकडे चार एक वर्ष काढले असतील त्या बहुतेकाचा अनुभव हा माझ्या सारखाच आहे. हे शहर भुरळ घालते तुम्हाला.
फिरायला म्हणुन येऊन चार दोन दिवस काढणे वेगळे व दीर्घ काळ वास्तव्य करणे वेगळे.
इथल्या लोकांचा, वातावरणाचा, खानपानाचा, एकुणच शहराच्या जिवनमानाचा वेगळेपणा त्यातली गंमत ही एखाद्या ट्रिपमधे समजने अवघड.
२०१० ला परत बदली घेऊन जरी मी पुण्याला आलो असलो तरी चार दोन महिण्याला माझी चेन्नईला चक्कर होतेच. त्या वेळी रोजच्या जेवनाचे वेळापत्रक आखुनच ठेवलेले असते.
मग अगदी ६० रुपयाच्या मेस पासुन पंचतारांकीत बुफे पर्यंत.
६० रुपयाच्या मेस मधे एक वेगळीच मजा असते. ती गर्दी, ते बसायचे बाकडे, ती घमेल्याने भात वाढण्याची पध्दत, ते सांबर, रस्सम. व हे सगळे खाताना त्या केळीच्या पानात झालेला राढा.
या सगळ्याची एक वेगळीच मजा आहे.
करोनाचा प्रभाव कमी झाल्यावर आज दोन वर्षानंतर चेन्नईला आलो. हॅाटेलला चेकइन करुन लगेच गाठले ते हॅाटेल अमरावती आणि ॲार्डर केली केली जगात भारी अंध्राथाली. (Andhra meals )
गरम गरम भातावर पडी (मेतकुटाचा प्रकार ) व त्यावर पुरे पुरे म्हणसतोवर टाकलेली तुपाची धार.
वाढलेल्या भाताचे २ते ३ भाग करुन मग मग एक एक भाग क्रमा क्रमाने आधी पुडी मग एखादी रस्सा भाजी, मग सांबर, मग रस्सम शवटी दह्याबरोबर.
यात जे समाधान जी तृप्ती ते शब्दात सांगणे कठीण.

उद्या पुंन्नुस्वाची बिर्याणी ……..

- Advertisement -

spot_img