अंतर फार कमी पण परिणाम असतात खोल.
म्हणुन म्हणतात कि संतुलित ठेवावे वर्तन, ढळु द्यायचा नसतो तोल.
राजकारणात डाव प्रतिडाव आणि चलाखी ही असते थोडी.
कपट कारस्थान म्हटले की सगळीच लांडी आणि लबाडी.
राजकारणात कितीही मारल्या उड्या तरी साधता जातो लोकशाहीचा भार.
कारस्थानाचा उद्देशच असतो फुट पाडुन स्थापित करायचा एकाधीकार,
राजकारणात हवी असते पद,सत्ता आणि अधिकार.
कारस्थान मात्र केवळ गळचेपी आणि सार्वजानिक व्यभिचार.
राजकारण असते खुले त्यात विरोधाला असतो वाव.
कपट कारस्थानामध्ये घातला जातो माणुसकीवर घाव.
राजकारणात असेच चुका सुधारण्याची सोय.
कपटात कारस्थानाच मार्ग मात्र पुर्णपणे अंधारमय.