spot_img
Homeलेखगांधीच्या मार्गावरचे भगतसिंग.

गांधीच्या मार्गावरचे भगतसिंग.

परवा मित्रा बरोबर गप्पा मारताना अचानक चर्चेचा विषय गांधी आणि भगत सिंग यांच्यावर गेला.
मित्र बोलला कि त्याला गांधीचा खुप राग येतो. काय तर ती अहिंसा अहिंसा कर होता गांधी. कशाला त्या म्हाताऱ्याचा फोटो पाहीजे नोटांवर, त्यापेक्षा भगतसिंग चा फोटो पाहीजे होता. भगतसिंगची फाशी गांधीजी वाचऊ शकले असते परंतु त्यांनी तसे प्रयत्न केले नाहीत.
आधी विचार केले विषय टाळावा नको पण नंतर विचार केले एकदा आपल्याला काय वाटते ते सांगून पाहावे. त्याला पटले तर पटले.
त्याने त्याचा विचार कसा अगदी सहज नकळत सांगून टाकला, गांधी नको भगतसिंग पाहिजे म्हणून, हे त्याचे त्यालाच नाही कळले.
एव्हढा सहज सोप आहे का गांधीच गणीत ?

आता त्याला समजेल, झेपेल अशा भाषेतून कसे सांगायचे हा विचार करितच होतो. कि तेव्हढयात मला
अजय देवगण चा २००२ मधील भगतसिंग यांचा चित्रपट आठवला, सुदैवाने त्याने हि तो पाहिला होता. मग त्याच चित्रपटातील काही घटनांचा आधार घेऊन मी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला.

भगतसिंग यांनी आपल्या सहकाऱ्यांसह केलेल्या अनेक क्रांतीकारी कारवाया सिनेमात दाखवल्या आहेत.
लाला लाजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी एका इंग्रज अधिकाऱ्याचा खुन करून बदला घेण्याचा या क्रांतिकारकांचा विचार होता,
प्रत्यक्षात एका इंग्रज अधिकाऱ्याचा खुन गोळ्या घालून खून केलाही, परंतु ज्याला मारले तो भलताच कोणी तरी निघाला. वरती त्या घाणेमुळे पोलिस कारवाई पासुन वाचण्यासाठी होत असलेली भगतसिंग व सहकार्यांची धावपळ त्याच चित्रपटात दिसले. त्यामुळे आशा हिंसक कारवाया करायच्या म्हणजे चांगली गुप्त हेर व्यवस्था व अशी साधनांची उपलब्धता आवश्यक असते ती कमतरता त्या वेळी भगतसिंग व इतर मंडळींना जाणवत होती हे दिसून येते.
केवळ प्रचंड हिमंत धाडस वगैरे असून चालणारे नव्हते. केवळ हिंमत व धाडस यांच्या बळावर फार फार तर आहि १ २ नाही तर आणखी १० १५ अधिकाऱ्यांना ते मारू शकले असते मात्र निर्दयी इंग्रस सरकारला तरी त्या १० १५ अधिकाऱ्यांच्या मरण्याने देशाच्या पातळीवर काही फरक पडला असता का हा प्रश्नच आहे.
एक होऊ शकले असते कि या अशा कारवायांमधून प्रोत्साहन घेऊन अनेक नवे क्रांतिकारी निर्माण झाले असते. लोकांमध्येही ऊर्जा व स्वतंत्र लढ्यात सहभाग वाढला आसता. मात्र त्याला हि फार यश येत नवहते कारण या क्रांतिकारी कारवाया जनतेपर्यंत पोहचत नव्हत्या. ही दुःखद भावना भगतसिंग व मंडळीं मध्ये होती. मुळातच भूमिगत राहून सर्व करभार चालवावा लावत असल्याने आपल्या ज्या भुमीका आहेत त्या ही लोकांपर्यंत पोहचत नाही त्यामुळे जनतेचा पाठिंबा आपल्याला मिळत नाही त्यामुळे हया आंदोलनाला एक मोठे स्वरुप मिळत नाही ही मर्यादा व खंत भगतसिंग व सहकारर्यानि व्यक्त केलेला एक प्रसंग या चित्रपटात होता तो त्याला विश्लेषण करून सांगितला.

आपण जीवावर उधार होऊन एव्हढे मोठे काम करतोय तरी लोकांपर्यंत हे पोहचत नाही व तिकडे काँग्रेस वाले नुसते शिंकले तरी ती देशभर बातमी पसरते. त्यामुळे आपण असे काहीतरी करावे कि ज्यामुळे आपल्याला प्रसिद्धी मिळेल व आपली भूमिका जण सामान्यांपर्यंत पोहचेल चळवळीला मोठे स्वरूप प्राप्त होईल. या विचारातूनच पार्लमेंट मध्ये बॉब फोडण्याचा व पोलिसांना समर्पण करण्याचं निर्णय झाला.
या सर्व घटना क्रमात मूळ मुद्दा हा दिसतो कि सर्वसामान्यांचा पाठिंबा जोवर मिळणार नाही तोवर हा स्वातंत्र्य लढा व्यापक होणार नाही.
भगतसिंग व सहकाऱ्यांच्या चळवळीत हि निर्माण झालेली प्रगल्भता होती, मनातील देशभक्तीला गरम तरुण रक्ताची जोड होती, छातीत धमक होती मात्र आता डोक्यात व विवेकि प्रगल्भता येत होती.
याचाच दुसरा टप्पा म्हणजे,
चित्रपटात दुसऱ्या एका प्रसंगात भगत सिंग आपल्या भाषणात बोलताना सांगतात कि केवळ स्वातंत्र्य हा आपला उद्देश नाही. केवळ इंग्रजांच्या हातून सत्ता काढुन ति मुठभरांच्या हातात द्यायची नाही. केवळ तसे केल्याने गरीब दलित, कामगार व शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. भगतसिंग यांनी जेव्हा पार्लमेंट मधे बॅांम फोडला होता त्या काळात कामगारांनी अनेक आंदोलने व संप पुकारले होते ते भांडवलदारांनी सरकारच्या मदतीने चिरडले होते. त्यामुळे स्वतंत्र्या बरोबरच देशात समता व बंधुता व सर्वसमावेशक व सर्वांना समान न्याय देणारी अशी व्यवस्था निर्माण करणेही आपली जबाबदारी आहे असे भगतसिंग सांगतात. पुढे ते म्हणतात कि हे जर आपण नाही केले तर हा देश स्वतंत्र तर होईल पण तो एक भ्रष्ट व शोषक देश म्हणुन राहील.
भगतसिंग यांच्या ह्या भुमिका ह्या आता स्वातंत्र्य लढ्याच्या पलिकडे झेपावत होत्या. सुरुवातीच्या अति आक्रमक व हिंसक कारवाया केल्यानंतर एक नविन प्रगल्भता चळवळीत त्यांनी आणलेली दिसते. आपल्या संघटनेच्या नावात त्यांनी ‘समाजवादी’ हा शब्द जोडला. हिंदुस्थान रिपब्लिक असोसिएशन चे त्यांनी हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिक असोसिएशन असे नामकरण केले.
जोवर देशातील गरीब,शेतकरी, शेतमजूर, कामगार वर्गाला स्वातंत्र्याचे महत्त्व समजणार नाही, स्वतंत्र्याचा काय फायदा होईल ते त्यांना दिसणार नाही समजणार नाही तोवर हे स्वातंत्र्य आंदोलन यशस्वी होणार नाही हे भगतसिंगयांनी ओळखले होते.व त्या पध्दतीने त्यांची पुढची वाटचाल दिसते.

हाच धागा पकडून गांधींनी खुप आधीच अफ्रिके पासुनच आपल्या आंदोलनाशी सर्वसामान्य लोकांना जोडून घेण्याची त्यांनी सुरुवात केलेली दिसते. त्यासाठी चळवळ व्यापक केलेली दिसते.
चंपारण्यामधील निलीचा सत्याग्रह. खेडा चा अतिरिक्त कराच्या विरोधातील सत्यग्रह. खिलाफत चळवळीला पाठींबा असेल, मिठाचा सत्याग्रह असेल, असहकार असेल, अगदी चलेजाव चळवळ असेल.
गांधींनी दलितांचे आदिवासीचे, महिलांचे विषय प्राधान्याने हाताळले अशा विविध अंगानी चळवळ उभारून गरीब, शेतकरी, दलित, शेतमजूर स्वातंत्र्य लढ्याशी जोडला. स्वतंत्र्य लढा देशाच्या एका टोक पासून दुसऱ्या टोकापर्यंत एका धाग्यात बांधला.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना १८८५ मध्ये झाली, ज्याचा मुख्य उद्देश भारतातील विविध प्रांतिक व धार्मिक गटांना एकत्र आणणे आणि ब्रिटिश राजवटीला स्वदेशी लोकांच्या मागण्यांकडे लक्ष देण्यासाठी भाग पाडणे हा होता. काँग्रेसचा प्रवास गांधींच्या नेतृत्वाखाली १९२० नंतर एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचला. गांधीपूर्व काँग्रेस आणि गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस यामध्ये लक्षणीय फरक दिसून येतो.

गांधीपूर्व काँग्रेसमध्ये नेत्यांमध्ये प्रमुखतः मध्यमवर्गीय, उच्चशिक्षित आणि ब्रिटिश शिक्षण प्रणालीत तयार झालेले लोक होते. त्यामध्ये दादाभाई नौरोजी, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, गोपाळ कृष्ण गोखले, बाळ गंगाधर टिळक यांसारख्या नेत्यांचा समावेश होता. या काळात काँग्रेसचा भर हा ब्रिटिश सरकारकडे निवेदन, याचिका, आणि संवादाद्वारे सुधारणा मागण्यांवर होता. याला “मध्यममार्गी राजकारण” म्हणत असत.
टिळक आणि त्यांच्या अनुयायांनी “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे” असे म्हणत, स्वराज्याची मागणी पुढे रेटली व यामुळे काँग्रेसमधील जहाल व मवाळ असे दोन गट दिसू लागले असले तरी हि चळवळ अजुनही शिक्षित उच्च मध्यमवर्गा पर्यंत च मर्यादित होती.
बंगालच्या फाळणीनंतर स्वदेशी चळवळ, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये जागृती केली. परंतु तरीही काँग्रेसची कार्यशैली प्रामुख्याने अजूनही ब्रिटिश प्रणालीशी सहयोगात्मक होती.

१९२० नंतर गांधींकडे नेतृत्व आले तेंव्हा गांधींनी सत्याग्रह आणि अहिंसेचा मार्गाने कार्यकारी आखला. यामुळे स्वातंत्र्य चळवळ लोकसहभागावर आधारित झाली. सर्वसामान्य लोक, महिलांचा सहभाग, शेतकरी, कामगार, आणि निम्नवर्गीय समाज गांधींच्या नेतृत्वाखाली चळवळीत मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले.
गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने हिंदू-मुस्लीम ऐक्यावर भर दिला. जो नंतर भगतसिंग यांच्या कार्यक्रमाचाही भाग होता. गांधीपूर्व काँग्रेसने भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा पाया रचला, तर गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसने सामाजिक सुधाराची चळवळ हि तेव्हढ्याच जोमाने चालऊन मुख्य स्वातंत्र्य चळवळ व्यापक बनवून ती निर्णायक टप्प्यावर पोहोचवली. गांधींनी काँग्रेसला केवळ राजकीय मंच न ठेवता, सामाजिक चळवळीत टिकचे रूपांतरित केले आणि भारताच्या स्वातंत्र्याला सामूहिक प्रयत्नांच्या बळावर साकार केले.
हि गांधीनी निर्माण केलेली अहिंसेची व सत्याग्रहाची ताकद होती. भगतसिंग व सहकार्यांनीही काही प्रमाणात हाच मार्ग स्वीकारल्याचे दिसून येते. सुरुवातीला जरी तरुण रक्ताने अन्याय अत्याचारा विरुद्ध जशी प्रतिक्रिया द्यावी. तशीच ती भगतसिंग व त्यांच्या सारख्या तरुण मंडळीची सशस्त्र प्रतीक्रीया होती. मात्र नंतरच्या काळात हि चळवळ काही प्रगल्भ बनत गेली त्याचे आणखी उदाहरण म्हणजे भगत सिंग यांनी तुरुंगात असताना कैद्यांच्या अनेक समस्या सोडवण्यासाठी व त्यांना न्याय वागणूक मिळवून देण्यासाठी साठी तुरुंगात गांधीच्या सत्याग्रह व उपोषण व असहकार या तत्वांचा यशस्वी अवलंब केलेला दिसतो. न्याय हक्क पाहीजे म्हणुन तुरुंगात पोलिस किंवा इंग्रज अधिकाऱ्यांवर हल्ले केले नाहीत.
अर्थात भगतसिंगांना जर अजु काही काळ मिळाला असता तर कदाचीत गांधी व भगतसिंग यांच्यातील अनेक समान धागे पुढे आले असते.
भगतसिंग अगदी तरुण वयात म्हणजे वयाच्या २३ च्या वर्षी शाहिद झाले यातील तीन महत्वाच्या घटना म्हणजे,
– १९२८ ला भगतसिंग यांनी एका इंग्रज अधिकाऱ्यांचा खुन केला.
– १९२९ ला पार्लमेंट मधे बॅांम फोडून पोलिसांच्या स्वाधीन झाले.
– १९३१ ला त्यांना फाशी देण्यात आली.

विशेष म्हणजे सावरकरांना अटक झाली १९११ ला व १९२४ पर्यंत ते अंदमानात होते आपला गनिमीकावा साधुन, अनेक माफीनामे लिहुन व इंग्रजांना वेड्यात काढुन १९२४ ला सावरकर अंदमान मधुन सुटून रत्नागिरीत १०३६ पर्यंत नागकैदेत असाताना आपला स्वातंत्र्याचा लढा पुन्हा चालु केला असे म्हणतात,
सावरकर १९२४ सुटल्यानंतर भगतसिंगांनाची फाशी हि १९३१ ची. या दरम्यान मात्र भागातसिंह यांनी सावरकरांचा मार्ग सवीकारलेला दिसत नाही. १९२९ ला बॅांबस्पोट केल्यावर स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले व कोणताही माफीनामा न लिहिता ते सरळ फासावर गेले.

भागात सिंग यांची फाशी वाचवण्याचा प्रयत्न गांधिजीं केला नाही अशी एक चर्चा केली जाते.
मुळात आपल्याला माफ करून इंग्रजांनी सोडून द्यावे हि भगतसिंग यांची इच्छा होती का हा विचार केला पाहिजे. अर्थात गांधींनी तसे प्रयन्त केले असल्याचे स्वतः त्या काळातील व्हाइसरॉय यांनी आपल्या पुस्तकात लिहून ठेवल्याचे वाचण्यात आले आहे.
तरीही गांधींनी प्रयत्न केले किंवा केले नाही या वादात न जात क्षणभर आपण असे धरू कि गांधींनी तशी विनंती केली व इंग्रजांनी भागात सिंग याना सोडून दिले असते तर स्वातंत्र्य प्राप्ती नंतर आज जे यक्तीमत्व आज भगतसिंग यांचे आहे ते तसे असते का? तुरुंगात जाणारे शेकडो तरुण त्या काळात होते. भागात सिंग यांच्या सह फासावर गेलेल्या राजगुरू व सुख्खादेव यांच्या व्यतिरिक्त किती सहकाऱ्यांची नावे आपल्याला तोंडपाठ आहेत त्याच प्रमाणे इतिहासाच्या पुस्तकाच्य चार ओळीत भगतसिंग सामावून राहिले असते.
भागात सिंग हे भागात सिंग झाले ते त्याच्या बलिदानामुळे. माफीमागून सुटका करून न घेतल्याने इंग्रजांपुढे न झुकल्यामुळे.
भगसिंघ यांनी तुरुंगात असताना आपला त्याग हा भारतीय जनमानसाच्या विवेकाला, आंतरिक आवाजात सद् घालेल व स्वातंत्र्याचा वणवा पेटेल अशीच भगतसिंघची धारणा दिसते, त्यांच्या या जनमानसाच्या विवेकाला हात घालण्याच्या प्रयत्न दिसतो.
स्वतःला पोलिसांच्या ताब्यात देऊन, तुरुंगात राहणे म्हणजे आत्मक्लेश करून समोरच्याला आपले म्हणजे ठणकावून सांगणे. गांधींनी तेच उपोषणाच्या, सत्याग्रहाच्या माध्यमातून साधले.
यातून दोघांना प्रसिद्धी व सामान्य जनतेची जस जासी सहानभूती मिळत व पाठिंबा वाढत तस तसा अन्याय करणाऱ्यावर दबाव निर्माण होत जात.
सुरुवातीला जहाल विचारांचे असलेले भगत सिंग हे अशा पद्धतीने शेवटच्या काळात तात्विक दुर्ष्ट्या गांधीच्या अधीक जवळ गेलैयाचे वाटतात.

- Advertisement -

spot_img