spot_img
Homeकविताआपण ठरवायच.

आपण ठरवायच.

संकर्षणची ची राजकारणावरशी कविता खूपच भाव खाऊन गेली.
कोणालाच नाही सोडले, त्याने सगळ्यांचीच उडवली.

लोकांच काय? त्यांना सगळीच मजा वाटते.
आहो! राहत्या सोसायटीची निवडणूक म्हटलं तरी सगळ्यांची फाटते.

तुझ्या दारातली छप्पल माझ्या दारात सरकली म्हणून भांडणारे आम्ही,
तिकडे सरसकट राजकारण्यांना सतत दोष देतो, सांगा मग देश चालवायचा कोणी.

नाही, हल्ली हल्ली जरा राजकारण जास्तच नासलय म्हणा.
पण राजकारणाच्या नावाने बोटे मोडण्याचा आपला हा प्रकारच आहे जुना.

नेमक गरजेच्या वेळेलाच आपणच बुद्धी गहाण ठेवतो.
वारंवार त्यांच्या त्याच त्याच भूल-थापांना आपणच नाही का पडतो बळी पडतो.

आपल आपण ठरवायच कोणावर किती विश्वास ठेवायचा आणि किती आहारी जायच.
सत्ताधारी कोणीही असो, वेळेला सत्तेचा कान धरायला आपण माघेपुढे नसत पाहायचं.

पाचशेच पेट्रोल आणि पाच हजारच सिलेंडर घ्यायला जरी आपण असलो तयार.
तरी आपल्या या भाबडेपणाचा लाभार्थी सरकार नाही तर तो असतो भांडवलदार.

आता तुम्ही म्हणाल,आम्हाला कुठे एव्हढा वेळ आहे खर खोट शोधायला.
आहो, फक्त सद्सद्विवेक बुद्धी जागी ठेवा, फार काही नाही लागत याला.

राजकारण हे सत्ताकारण असते, ते साम दाम दंड भेद सगळच वापरतील.
पण त्यांना हि भीती सतत वाट वाटली पाहिजे, कि लोक काय विचार करतील.

सगळाच दोष आपण राजकारण्यांवर टाकून नाही चालणार.
आधी आपण ठरवायच आपल ‘Vote’ जाती धर्मा पलीकडे कधी जाणार.

- Advertisement -

spot_img