माझ्या विठ्ठलाला म्हणे बडव्यांनी घेरलाय
म्हणुन का तुम्ही आता सत्तेचा हात धरलाय.
खरा,खोटा भक्त असा भेद तो कधी करत नाही.
आपल्याच भक्तीत राहते नेहमी कमतरता काही.
तुम्हीच घेरायचा कि मग तुमच्या विठ्लाला.
का आजवर येत होतात फक्तच प्रसादाला.
सोडवायचा ना त्याला मग, त्या बडव्यांच्या तावडीतून.
पण आपल्या कर्माची फळ पाहुन, तुम्हीच ठोकलीत धुम.
आहो विठ्ठल असा कधीच घेरला जात नसतो.
सगळ्यांचा लेखाजोखा त्याच्याकडेच तर असतो.
असेल खरच तो विठ्ठल तर विश्वास ठेव त्यावर.
स्वार्थ लपत नसतो रे, तु कितीही आरडाओरडा कर.
गेलास आता सोडुन. जा, कर नव्याने सुरुवात.
नवा विठ्ठल शोध, पण त्याची तरी दे साथ.
गेल्यावरही तुला तो आशिर्वादच देत राहील.
येशील का परत कधी, तो सतत वाट पाहील.
तो हरी आहे, व्यक्तीत नाही प्रत्तेकाच्या कर्मात असतो.
त्याच तर फिक्सच असत, आपणच विठ्ठल बदलतो